आ. सावरकर यांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांना 15 सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी
(विशाल पुरंदरे) अकोला : ग्रामीण भागातील नागरिकांची वेळेची व पैशांची बचत व्हावी यासाठी नुकतेच पळसो बढे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांना एकाच ठिकाणी पंधरा सुविधांचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. पुढे बोलताना आमदार सावरकर म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामीण पांदण रस्ते, शेतकऱ्याला मदत असे अनेक उपक्रम या महायुती सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण, शेतकरी, मध्यमवर्गीय कामगार यांना केंद्रबिंदू मानून शासन कार्यरत आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा दिली. त्यानंतर महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा या संदर्भात दिशादर्शक मार्गदर्शन केले. परंतु काँग्रेसने या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही, त्यामुळे ...