मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर अकोला अर्बन बँकेची कौतुकाची थाप

 



अकोला – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धन करण्याच्या हेतूने दि अकोला अर्बन को-ऑप. बँक (The Akola Urban co- op Bank Ltd, AKOLA) यांच्या वतीने शालांत परीक्षेत शाळास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी यांच्या सह बँकेचे संचालक संजय कोटक, दिपक मायी, बँकेचे संचालक व प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी विनोद अग्रवाल उपस्थित होते.


प्रास्ताविकात राजन सोनटक्के यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांच्या कष्टाचे कौतुक व्हावे यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते शार्दूल दिगंबर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मनुष्याच्या जीवनात १२ वर्षानी खरे यश मिळविण्यास सुरवात होते. आपण शाळेत प्रवेश घेतल्यापासून १२ वर्षानी १० वी चा पहिलं टप्पा येतो. इथे जे यश मिळते तिथून विद्यार्थांचे जग विस्तारत जाते. पुढे त्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापूरषांचे चरित्र वाचन करणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समर्पण, संकल्प, त्याग व देशसेवेचा वसा आपण घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 


बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास अकोला शहरातील २५ शाळांमधून प्रथम, द्वितीय आलेले ५६ गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक त्यांचे पालक, शिक्षकवृंद तसेच बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान आमच्या पुढील शिक्षण प्रवासात अधिक प्रेरणा देणारा आहे.” पालक आणि शिक्षकांनीही बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी मानले.

टिप्पण्या