मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अखेर बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्षा फळाला, 28 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु

                                - विशाल पुरंदरे - चांदुर बाजार -- तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पातील 2006 ते 2013 या कालावधीत सरळ खरेदी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अत्यंत कमी दराने जमीनी खरेदी करण्यात आल्या होत्या. दरम्यान या शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याचा संवैधानिक अधिकार सुध्दा तत्कालीन सरकारने शिल्लक ठेवला नव्हता.त्यामुळे न्यायाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी सोडली होती.मात्र मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने बारा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षा नंतर अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति हेक्टरी पाच लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदानाला नियामक मंडळाच्या माध्यमातून मंजुरी देऊन विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना एकुण आठशे बत्तीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळवून दिला. गेल्याच वर्षी 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनादेश वितरणाचा शुभारंभ अमरावती मधुन केला होता. तेव्हापासुन राज...

उरल्या केवळ दिनेशच्या आठवणी..




सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. घरोघरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. महालक्ष्मी पूजनाची सुद्धा लगबग सुरू होती. अशातच अचानक दिनेश सरोदे यांच्या निधनाची वार्ता कानावर आली. दोन मिनिट मन सुन्न झालं. 



माझा आणि गणेश, दिनेश आणि योगेश तीनही भावांचा तीस वर्षापासूनचा परिचय. लहानपणापासूनच अत्यंत परिश्रमी. जिद्द व चिकाटीने व्यवसाय करीत उदरनिर्वाह चालविणारे सरोदे कुटुंब. दिनेश म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व. कितीही ताण असला तरी प्रसन्न राहण्याची कला त्याला साधली होती. आपल्या चिंता दुःख बाजूला सारून सदैव दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तो तत्पर असायचा. सतत चेहऱ्यावर स्मितहास्य.



कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाण्याच्या दिनेशच्या स्वभावामुळे भौरद ग्रामपंचायत सदस्य पदी त्यांची निवड झाली. बालपणापासूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे वरदान त्याला लाभले होते. त्यामुळे दिनेश चा मित्रपरिवार वाढतच गेला. लक्ष्मी नगर मध्ये गणेशोत्सव, दुर्गोत्सव, भागवत सप्ताह किंवा इतर कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिनेश भाऊ नेहमीच पुढाकार घेत.



 गेल्या एक दोन वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाटत होती. परंतु अचानक अशी घटना घडेल, याची अजिबात कल्पना नव्हती. अजूनही दिनेश आपल्या मधून गेला हे खरे वाटत नाही. दिनेशच्या अचानक जाण्याने जुन्या शहरात, आमच्या लक्ष्मीनगर मध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. यापुढे दिनेश भाऊ नसले तरी त्यांच्या आठवणी सतत चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देत राहतील.

टिप्पण्या