मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

श्री शिवाजी महाविद्यालयात गेस्ट लेक्चर संपन्न

 


अकोला, दि 24 - श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे प्राचार्य डॅा रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे माजी विद्यार्थी मोहम्मद उझेर खान, उप-व्यवस्थापक, व्यापार वित्त आणि परकीय चलन विभाग, एस बँक, शाखा मुंबई यांच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अस्मीता बढे होत्या. याप्रसंगी विचारपिठावर वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संजय तिडके,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा एस एच मळसने, विज्ञान विभाग प्रमुख प्रा एस डी तराळे उपस्थित होते.


प्रमुख वक्ते उझेर खान यांनी सांगितले की,माझ्या सारखा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर शिखर बॅंक असणाऱ्या बॅंकेत उप-व्यवस्थापक होवु शकतो तर तुम्ही देखील मोठ्या पदावर जावु शकता त्यासाठी मात्र गरज आहे प्रचंड मेहनत, सातत्य आणी अभ्यासाची.स्वत:चा जीवन संघर्ष त्यांनी मांडला तेव्हा एक एक प्रसंग सिनेमा सारखा वाटत होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आजचे विद्यार्थी हे उद्याचे उद्योजक, आर्थिक सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट आणि व्यवस्थापक आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करा शिक्षणचं तुमच्या जीवनाची दिशा ठरवु शकते.


अध्यक्षीय भाषणात डॅा अस्मीता बढे यांनी सांगीतले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे ओझे म्हणुन न पाहता एक आव्हान म्हणून बघायला हवे, म्हणून चांगला अभ्यास करा आणी यशस्वी व्हा असे प्रतिपादन केले.

मान्यवरांनी समायोचीत भाषणे केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन प्रा सुनीता खेकाळे (भिसे) यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा नितीन नायसे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

————————————

टिप्पण्या