मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

रुग्णांची प्रकृती ठणठणीत करणारे कोण आहेत नॅचरोपॅथिस्ट किरण सदांशिव ?

 


अकोला : आज घरोघरी शुगर, मुळव्याध, सोरायसिस, ब्लड प्रेशर, संधिवात दम्याचे पेशंट आढळून येतात. डॉक्टर कडे लाखो रुपये खर्चूनही अनेकांना पाहिजे तसा गुण येत नाही. अशा शेकडो रुग्णांना रियांश (Riyansh) आयुर्वेदिक कंपनीच्या अमृत ज्यूस (Amrit juice) औषधाने ठणठणीत केले आहे. अमृत ज्यूस मुळे एकीकडे रुग्णांची प्रकृती उत्तम होत असताना किरण सदांशिव यांची सुद्धा आर्थिक भरभराट झाली. सहा महिन्यापूर्वी काम सुरू केले तेव्हा 450 रुपये पहिले उत्पन्न त्यांना मिळाले. आता महिन्याकाठी जवळपास लाख रुपये उत्पन्न घेणारे किरण सदांशिव अचानक चर्चेत आले आहेत.




ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर डिप्लोमा, नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला. त्यानंतर अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात कम्प्युटर क्लास सुरू केला. त्याचवेळी पार्ट टाइम एका कंपनीत संगणक परिचालक म्हणून काम केले. त्यानंतर जवळपास 15 वर्ष मार्केटिंग जॉब केला. खाजगी नोकरीतून फार काही साध्य होत नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 


कार सर्विसिंग सेंटर सुरू केले, यातूनच जुन्या कार खरेदी विक्रीचा देखील प्रयत्न केला. नव्याने कम्प्युटर क्लास, पर्सनल डेव्हलपमेंट क्लासेस सुरू केले, कशातच मन लागत नव्हते, कारण आकाशात झेप घ्यायची होती. मात्र संधी मिळत नव्हती... ती अचानक एक दिवस घरी चालत आली.


रवींद्र राठोड व विठ्ठल मगर हे दोन्ही जुने मित्र घरी आले. गप्पा रंगात आल्यावर त्यांनी रियांश अमृत ज्यूस विषयी माहिती दिली. शेकडो रोगांवर एकच गुणकारी औषध असल्याचे सांगितले. माहिती ऐकल्यावर त्यांनी स्वतः एक महिना अमृत ज्यूस सेवन केले. त्यानंतर अनेक रुग्णांना दिले. हळूहळू दमा, सोरायसिस पॅरॅलिसिस, शुगर, बीपी, किडनी स्टोन अनेक लहान मोठ्या आजाराचे रुग्ण बरे होऊ लागले. परत औषधाची डिमांड वाढली. रियांश कंपनी मध्ये नेटवर्क मार्केटिंग करण्याची सुद्धा संधी उपलब्ध आहे. मग इतरही बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ते घरोघरी जाऊन मीटिंग घेऊ लागले. अमृत ज्यूस ची माहिती घरोघरी पोहोचली. एका मागे एक लोक जुळत गेले. आज त्यांनी अकोला शहरात व परिसरात जवळपास 250 तरुणांची साखळी तयार केली आहे. सहा महिन्यांपूर्वी 450 रुपये उत्पन्न मिळविणारे किरण सदांशिव आज महिन्याला लाख रुपये कमवीत आहेत. येत्या एका वर्षात डायमंड होण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी आपल्या यशा चे श्रेय रियांश कंपनीचे सीएमडी मधुकर जाधव, (Madhukar jadhav) प्रकाश तामसेकर, (prakash tamsekar) विठ्ठल मगर, (vithhal magar) रवींद्र राठोड (ravindra Rathod) यांना दिले आहे.  

टिप्पण्या