मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक प्रकरण विधानसभेत पोहोचले

  



अकोला : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी योजनेत फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अंदुरा अग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, अंदुरा यांनी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केली. मात्र, या प्रक्रियेत ७० शेतकऱ्यांची ६४ लाख रुपयांची थकबाकी झाली असून, त्यांना उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. आता हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचले आहे.


या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत आवाज उठवला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी मांडलेल्या कलम २९२ च्या प्रस्तावावर भाष्य करताना त्यांनी या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाफेडचे व्यवस्थापक ढेकणे यांच्यावरही शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.


शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असून, त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या कष्टाची लूट होऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या प्रकरणाच्या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

टिप्पण्या