मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक प्रकरण विधानसभेत पोहोचले

  



अकोला : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी योजनेत फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अंदुरा अग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, अंदुरा यांनी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केली. मात्र, या प्रक्रियेत ७० शेतकऱ्यांची ६४ लाख रुपयांची थकबाकी झाली असून, त्यांना उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. आता हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचले आहे.


या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत आवाज उठवला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी मांडलेल्या कलम २९२ च्या प्रस्तावावर भाष्य करताना त्यांनी या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाफेडचे व्यवस्थापक ढेकणे यांच्यावरही शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.


शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असून, त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या कष्टाची लूट होऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या प्रकरणाच्या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

टिप्पण्या