सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक प्रकरण विधानसभेत पोहोचले

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

  



अकोला : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी योजनेत फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अंदुरा अग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, अंदुरा यांनी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केली. मात्र, या प्रक्रियेत ७० शेतकऱ्यांची ६४ लाख रुपयांची थकबाकी झाली असून, त्यांना उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. आता हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचले आहे.


या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत आवाज उठवला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी मांडलेल्या कलम २९२ च्या प्रस्तावावर भाष्य करताना त्यांनी या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाफेडचे व्यवस्थापक ढेकणे यांच्यावरही शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.


शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असून, त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या कष्टाची लूट होऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या प्रकरणाच्या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)