मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

खा. अनुप धोत्रे लोकसभेत गरजले

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_1.html 



नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करा 


अकोला : नागपूर मुंबई दरम्यान प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूर अकोला मुंबई मार्गावरील रेल्वे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या व त्यांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी

नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी आज लोकसभेत लावून धरली. 

अकोल्यातील युवा खासदाराच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने संपूर्ण लोकसभेचे लक्ष वेधून घेतले. 

भारतीय रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने अमृत भारत योजना 2.0 अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आज लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.


गतिशक्ती टर्मिनल मंजूर


 अकोला रेल्वे स्थानकासाठी गतिशक्ती टर्मिनल मंजूर केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. गतिशक्ती टर्मिनलमुळे आधुनिक व तत्पर रेल्वे सेवा उपलब्ध होऊन आर्थिक विकासालाही गती मिळेल. हा दूरदृष्टीचा निर्णय घेतल्यामुळे अकोल्याच्या आणि प्रामुख्याने विदर्भाच्या प्रगतीस हातभार लागणार आहे.

टिप्पण्या