मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

खा. अनुप धोत्रे लोकसभेत गरजले

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_1.html 



नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करा 


अकोला : नागपूर मुंबई दरम्यान प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूर अकोला मुंबई मार्गावरील रेल्वे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या व त्यांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी

नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी आज लोकसभेत लावून धरली. 

अकोल्यातील युवा खासदाराच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने संपूर्ण लोकसभेचे लक्ष वेधून घेतले. 

भारतीय रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने अमृत भारत योजना 2.0 अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आज लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदार धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.


गतिशक्ती टर्मिनल मंजूर


 अकोला रेल्वे स्थानकासाठी गतिशक्ती टर्मिनल मंजूर केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. गतिशक्ती टर्मिनलमुळे आधुनिक व तत्पर रेल्वे सेवा उपलब्ध होऊन आर्थिक विकासालाही गती मिळेल. हा दूरदृष्टीचा निर्णय घेतल्यामुळे अकोल्याच्या आणि प्रामुख्याने विदर्भाच्या प्रगतीस हातभार लागणार आहे.

टिप्पण्या