https://tumchyasathich.blogspot.com/2024/10/blog-post_76.html
लढवय्या नेता मनोजभाऊ चव्हाण यांचे ठिकठिकाणी स्वागत
अकोला : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या विदर्भ बळीराजा (baliraja) प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या संघर्षाला यश आले आहे. हा लढा उभारणारा लढवय्या नेता मनोजभाऊ चव्हाण यांचे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
नुकतीच सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे नियामक मंडळाची बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत विदर्भातील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लक्ष रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी देण्यात आली, १६,६३३ हेक्टर जमीनीसाठी ८३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे देवेंद्र,(Devendra)फडणवीस यांनी सांगितले.
तर शेतकऱ्यांना न्यायालयात जाता आले असते...
तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ६ जून २००६ च्या जि.आर.नुसार सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी (kharedi) करून घेतल्या होत्या सदर शेतकऱ्यांचे न्यायालयात जाण्याचे संवैधानीक अधिकार सुध्दा हीरावुन घेतले होते. १८९४ च्या भूसंपादन(bhusampadan) कायद्यानुसार जमीनी संपादित केल्या असत्या तर शेतकऱ्यांना न्यायालयात जाता आले असते.त्यामुळे संघर्षा शिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय कोणताच उरला नव्हता.
पोटतिडकिने प्रश्न मांडले नाही
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या प्रखर नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून विदर्भात ऐतिहासिक आंदोलने करण्यात आली.अखेर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला. दरम्यान अमरावती विभागातील काही मोजक्या आमदारांनी प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे सभागृहात मांडलेत. परंतु पोटतिडकीने मांडले नसल्याचे मनोज चव्हाण यांनी बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथे सत्कार समारंभात बोलतांना सांगितले.
तर प्रकल्पग्रस्तांना न्याय केंव्हाच मिळाला असता
विदर्भातील सर्व पक्षीय आमदारांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले असते तर प्रकल्पग्रस्तांना न्याय केंव्हाच मिळाला असता असेही मनोज भाऊ चव्हाण यांनी बोलताना सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाने ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.
पदाधिकाऱ्यांचा थाटात सत्कार
जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्त गावातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी जल्लोष साजरा करत मनोजभाऊ चव्हाण यांचे सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संघटनेचे सहसचिव भुषण चौधरी, दिलीप कदम, राजु भाऊ देठ,ह.भ.प.गोविंद काळे महाराज, उपसरपंच राजेंद्र पाटील खोंड,सागर तायडे,अजय भोजने, श्रीराम पाटील, अनंत पाटील, पुरुषोत्तम उंबरकर, अनिल कोगदे, बळीराम तितरे,गोपाल तायडे,दलाधन तायडे, रामराव नागे, मनोहर पाटील, गजानन तायडे, विश्वास पाटील, संतोष हागे, विष्णूपंत तायडे, उपस्थित होते.दरम्यान निंभा फाटा येथे अंत्री येथील बाळापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक जनार्दनजी साबळे,बाळूभाऊ इंगळे,दिपकसेठ साबळे,मदन पाटील, किसनराव राऊत व शेतकऱ्यांनी मनोज भाऊ चव्हाण यांचे स्वागत केले.