मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

खबरदार ! विकासाच्या नावावर जनतेची आर्थिक कोंडी कराल तर... – आ. साजिद खान पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

 



अकोला : मनपात सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांवर कचरा संकलनाच्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांचा कर लादण्याचा निर्णय घेतला गेल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आधीच विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर हा नवा ‘भुर्दंड’ पडत असल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


दरम्यान, कचरा कर वसुली सुरू असतानाच शहरातील घंटागाडी सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अनेक भागांत घंटागाड्या वेळेवर न येणे, काही ठिकाणी पूर्णपणे सेवा बंद पडणे, तर काही भागांत कचऱ्याचे ढिग साचणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर आ. साजिद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवत या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. “विकासाच्या नावाखाली जनतेची आर्थिक कोंडी करणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत; मात्र करांच्या माध्यमातून नागरिकांची पिळवणूक करणे खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.


आधीच ‘डर्टी टॅक्स’च्या नावाखाली नागरिक त्रस्त असताना त्यात आणखी ६०० रुपयांचा कचरा कर लादणे म्हणजे सामान्य माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. “सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली आर्थिक भार टाकण्याऐवजी पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत,” असा टोला त्यांनी लगावला.


मनपाने शहरातील स्वतःच्या मालकीच्या मोक्याच्या जागांचा योग्य वापर करून महसूल वाढवावा, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली. मुख्य बाजारपेठेतील दानाबाजार परिसरात अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सवलती द्याव्यात, तसेच इतर प्रमुख ठिकाणीही अशा प्रकल्पांची उभारणी करून मनपाचा आर्थिक पाया मजबूत करावा, अशी मागणी त्यांनी केली.


“शहर विकासाच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाला आमचा ठाम पाठिंबा राहील; मात्र जनतेच्या खिशावर डल्ला मारणारे निर्णय आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा कडक इशारा देत आ. साजिद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.


यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, कपिल रावदेव, नगरसेविका प्रिया अश्विन शिरसाट, आर्शिया परवीन मोहम्मद शारिक, निखत परवीन अफसर कुरेशी, निलोफर खान सोहेल खान, आकाश कवडे, गुड्डू पठाण, मोहम्मद शारिक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या