श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोला यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अकोला : येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेचे एकूण 649 विद्यार्थी बारावी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 547 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाचा निकाल 55.55% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 95.50% लागला आहे.
आयुष संजू गीते 84.50% गुण घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे, गार्गी निर्मलकुमार गजरे 82% गुण घेऊन द्वितीय आणि सायली श्रावण इंगळे 81.67% गुण घेऊन तृतीय आली आहे
कला शाखेचा निकाल 68.60% लागला असून कु. नंदिनी सुभाष तायडे 91% गुण घेऊन प्रथम आली आहे.
कु. श्रुती संतोष अंभोरे 88.83% गुण घेऊन द्वितीय आली आहे.
कु. नेहा नागसेन शिराळे 86% गुण घेऊन तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल 76.92% लागला असून कु. नेहा नंदकिशोर जांभेकर 84.50% गुण घेऊन प्रथम आली आहे.
लुबना गझल महम्मद साजिद 83.67% गुण घेऊन द्वितीय आली आहे.
महंमद अबूबकार अब्दुल नजीम 81.67% गुण घेऊन तृतीय आला आहे.
महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा संस्था कार्यकारिणीसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, क.म.वि. प्रमुख प्रा. सुशीला मळसने, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. श्रीकृष्ण तराळे, कला विभाग प्रमुख डॉ. अर्चना पोटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अस्मिता बढे, प्रबंधक राजेश गीते व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा