मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

मोरणा नदीचा कायापालट करून दाखवू : जयंत मसने

  अकोला : भाजप विरोधक महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराजित झाल्याने, हताश, निराश व सत्तेपासून वंचित राहिल्याने सत्तारूढ शहर सुधार समिती च्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झाले तरी मोरणा नदीचा आम्ही कायापालट करून दाखवू अशी ग्वाही भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी दिली.  आपली नदी आपली जबाबदारी अभियानाच्या पाचव्या दिवशी त्यांनी वरील विचार व्यक्त केले.    आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल,महापौर शारदाताई रणजीत खेडकर, पवन महल्ले, भाजप अकोला महानगराध्यक्ष जयंत मसने, सिद्धार्थ शर्मा, अर्चनाताई शर्मा, किशोर पाटील, करण शाहू, अमोल मोहकार, राजेंद्र गिरी, प्रकाश धोगलीया, हेमंत शर्मा तुषार भिरड वैशाली शेळके चंदा शर्मा चंदा ठाकूर, निशा कडी, विजय चौधरी, शितल जैन, गणेश अंधारे जाकीर हुसेन, डॉक्टर राजू देशपांडे डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर प्रशांत अग्रवाल, अमोल गीते दिलीप मिश्रा सागर शेगोकार अजय शर्मा, राजेश्वर धोटे, नितीन ताकवले मंजुषाताई शेळके, सह विविध क्षेत्रातील नऊ सामाजिक संघटना व मोठ्या संख्येने न...

महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी आमदार सावरकर यांचे प्रतिपादन

 




अकोला : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील महिलांना शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित केले. मातृशक्तीला समानतेची वागणूक मिळावी यासाठी आजीवन वैचारिक लढा दिला. अशा थोर पुरुषाचे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याची संधी मला लाभली हे माझ्या जीवनातील सुवर्णक्षण आहेत असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


पुढे बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, मातृशक्ती सुरक्षित राहील, संस्कारी राहील, शिक्षित राहील तरच राष्ट्र पुढे जाईल हे महात्मा फुले यांनी ओळखले होते.

 स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असे यावेळी ते म्हणाले.


  महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, राजेश बेले, डॉक्टर शंकरराव वाकोडे, संजय कोरडे, उमेश जाधव गणेश लोड, मनीष गावंडे भरत चराटे, डॉक्टर अमित कावरे, प्रवीण पाटील हगवणे, रामदास लांडे, गणेश राव तायडे, विवेक भरणे ,अंबादास उमाळे, राजू उगले, शिवलाल इंगळे, माधव मानकर, छायाताई मानकर, गजानन उंबरकार, मिलिंद राऊत, संदीप गावंडे, एडवोकेट कल्पना गोटफोडे, राजू वारूकार , पवन महल्ले , करण शाहू, अजय शर्मा सतीश ढगे, नितीन ताकवले, प्रशांत अवचार,अण्णा उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते. 


दि शताब्दी वर्षानिमित्त महायुती सरकारने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम होणार असून कार्यकर्त्यांनी या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. 

यावेळी संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशिष काकड, प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

टिप्पण्या