मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.           प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.            यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भा...

महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी आमदार सावरकर यांचे प्रतिपादन

 




अकोला : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील महिलांना शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित केले. मातृशक्तीला समानतेची वागणूक मिळावी यासाठी आजीवन वैचारिक लढा दिला. अशा थोर पुरुषाचे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याची संधी मला लाभली हे माझ्या जीवनातील सुवर्णक्षण आहेत असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


पुढे बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, मातृशक्ती सुरक्षित राहील, संस्कारी राहील, शिक्षित राहील तरच राष्ट्र पुढे जाईल हे महात्मा फुले यांनी ओळखले होते.

 स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असे यावेळी ते म्हणाले.


  महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, राजेश बेले, डॉक्टर शंकरराव वाकोडे, संजय कोरडे, उमेश जाधव गणेश लोड, मनीष गावंडे भरत चराटे, डॉक्टर अमित कावरे, प्रवीण पाटील हगवणे, रामदास लांडे, गणेश राव तायडे, विवेक भरणे ,अंबादास उमाळे, राजू उगले, शिवलाल इंगळे, माधव मानकर, छायाताई मानकर, गजानन उंबरकार, मिलिंद राऊत, संदीप गावंडे, एडवोकेट कल्पना गोटफोडे, राजू वारूकार , पवन महल्ले , करण शाहू, अजय शर्मा सतीश ढगे, नितीन ताकवले, प्रशांत अवचार,अण्णा उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते. 


दि शताब्दी वर्षानिमित्त महायुती सरकारने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम होणार असून कार्यकर्त्यांनी या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. 

यावेळी संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशिष काकड, प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

टिप्पण्या