मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अकोला, दि. ९ जुलै : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. गिरीश गोखले , प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कु. रिदम शाह उपस्थित होत्या. यावेळी अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष प्रा. दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.           प्रास्ताविकात प्रा. दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रांतील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.            यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया पाटील (१००% गुण), ईशान आडे, तेजल भा...

पावसाळ्यापूर्वी 144 मोठ्या नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करा: गिरीश जोशी

  



अकोला : पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असल्याने अकोला शहरातील 144 मोठ्या नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश कुमार जोशी यांनी केली आहे. 


जोशी म्हणाले, "मनपा आयुक्त, महापौर व सभापती यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सफाई मोहिमेला गती द्यावी. राज्यात इतरत्र नाले सफाई अभियान सुरू झाले असून अकोल्यात मात्र अद्याप कामाला वेग आलेला नाही."


या भागात पाणी साचण्याची समस्या

 

मोठी उमरी, गीता नगर, शिवसेना वसाहत, डाबकी रोड, रणपिसे नगर, अकोट फाईल, न्यू तापडिया नगर, खरप परिसर, दुर्गा चौक, खडकी या भागांमध्ये पावसाळ्यात घरांमध्ये व रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.


हद्दवाढ भागाचाही समावेश करा  


शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह अकोला महानगरात एकूण 144 नाले आहेत. या सर्व नाल्यांच्या सफाईकडे 7 जूनपूर्वी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोशी यांनी केली.


सकाळीच राबवा मोहीम 


अकोल्यात सध्या उष्णतेची लाट आहे. कामगारांच्या आरोग्याचा विचार करून नाले सफाई मोहीम पहाटे किंवा सकाळच्या वेळेत राबवावी, असेही जोशी यांनी सुचवले. 

टिप्पण्या