मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी

 


वाई प्लस’ सुरक्षेची काँग्रेसची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

अकोला : अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार दबाव आणत तात्काळ ‘वाई प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत संताप व्यक्त केला.


 “लोकप्रतिनिधींनाच धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडे गुन्हेगारी टोळ्यांकडून, विशेषतः कथित बिश्नोई गँगकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या घटनांनी राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार पठाण यांना मिळालेली धमकी ही केवळ एका व्यक्तीविरुद्धची बाब नसून लोकशाही व्यवस्थेलाच दिलेले आव्हान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. 


निवेदनात आमदार पठाण यांना तात्काळ उच्चस्तरीय पोलीस सुरक्षा देण्याची, विद्यमान सुरक्षेचा आढावा घेऊन ‘वाई प्लस’ दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तसेच धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधण्याचीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


यावेळी बबनराव चौधरी, प्रदीपकुमार वखारिया, कपिल रावदेव, तश्वर पटेल, मो. युसुफ मो. इलियास, विजय पचारे, मोहम्मद इरफान, शे. इब्राहिम शे. कासम, याकूब खान, हुसेन चौधरी, मोईन खान, मेहबूब खान, आर्किटेक निलोफर खान सोहेल खान, निखत शाहीन अहमद कुरेशी, कनिश खातून मो. इलियास, आर्शिया परवीन मो. शारिक, सैय्यद यासीन, शेख अब्दुल्लाह, सैय्यद अहमद, सैय्यद शहजाद सज्जू भाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या