मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

निळकंठ सूतगिरणी पुन्हा होणार सुरू

  




अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तब्बल दोन दशकांपासून बंद असलेली नीलकंठ सूत गिरणी पुन्हा सुरु होणार आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. निळकंठ सूतगिरणी सुरू करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी सतत पाठपुरावा केला.


निळकंठ सुत गिरणी बंद पडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. आता गिरणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतक-यांना याचा थेट फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. 




अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज एम. खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवे आयाम मिळत आहेत. नीलकंठ सूत गिरणीचे पुनरुज्जीवन झाल्याने रोजगार वाढेल, शेतक-यांच्या कापसाला नवा आधार मिळेल आणि अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल." 




आमदार रणधीर सावरकर हे उद्योगपूरक दृष्टिकोनातून काम करीत असून, विविध उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळेच हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला, असेही उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. 


या निर्णयामुळे अकोला जिल्हा औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल आणि भविष्यात नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या