मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

निळकंठ सूतगिरणी पुन्हा होणार सुरू

  




अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तब्बल दोन दशकांपासून बंद असलेली नीलकंठ सूत गिरणी पुन्हा सुरु होणार आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. निळकंठ सूतगिरणी सुरू करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी सतत पाठपुरावा केला.


निळकंठ सुत गिरणी बंद पडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. आता गिरणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतक-यांना याचा थेट फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. 




अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज एम. खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवे आयाम मिळत आहेत. नीलकंठ सूत गिरणीचे पुनरुज्जीवन झाल्याने रोजगार वाढेल, शेतक-यांच्या कापसाला नवा आधार मिळेल आणि अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल." 




आमदार रणधीर सावरकर हे उद्योगपूरक दृष्टिकोनातून काम करीत असून, विविध उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळेच हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला, असेही उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. 


या निर्णयामुळे अकोला जिल्हा औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल आणि भविष्यात नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या