मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

यशश्री जनकल्याण फाउंडेशन व माँ सारदा ज्ञानपीठ तर्फे पालकांना वृक्ष वितरण

 



अकोला : एक वृक्ष मा के नाम उपक्रमांतर्गत यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या माध्यमातून माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय गीता नगर येथे वृक्ष वितरित करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष वितरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


 माँ सारदा यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून एक पेड मा के नाम कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे, वन विभाग परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड, माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चे उपाध्यक्ष सत्यनारायण बाहेती, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक राहुल देशमुख व यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे, राजेंद्र पवार अशोक कोकाटे  मंचावर उपस्थित होते.



प्रमुख पाहुणे शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे यांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वन परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड यांनी वृक्ष कसे लावायचे व कसे संगोपन करायचे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच सत्यनारायण बाहेती यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श विद्यार्थ्यासमोर मांडला 


    एक पेड माँ के नाम व एक सेल्फी पेड के साथ विषय घेऊन विद्यार्थ्यांनी वृक्षा चे संगोपन करून संगोपनाची माहिती यशश्री जनकल्याण फाउंडेशन ला पुरवावी. एक वर्ष नंतर त्या विद्यार्थ्यांचा यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने मौलिक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात येईल असे यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी म्हटले.


 प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत खत्री यांनी केले. कार्यकमाची सांगता सर्व वृक्ष विद्यार्थी व पालकांना वितरण करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे सदस्य तसेच माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चेशिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले

आभार प्रदर्शन यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी केले.

टिप्पण्या