मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

यशश्री जनकल्याण फाउंडेशन व माँ सारदा ज्ञानपीठ तर्फे पालकांना वृक्ष वितरण

 



अकोला : एक वृक्ष मा के नाम उपक्रमांतर्गत यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या माध्यमातून माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय गीता नगर येथे वृक्ष वितरित करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष वितरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


 माँ सारदा यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून एक पेड मा के नाम कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे, वन विभाग परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड, माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चे उपाध्यक्ष सत्यनारायण बाहेती, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक राहुल देशमुख व यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे, राजेंद्र पवार अशोक कोकाटे  मंचावर उपस्थित होते.



प्रमुख पाहुणे शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपाल सुर्वे यांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वन परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड यांनी वृक्ष कसे लावायचे व कसे संगोपन करायचे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच सत्यनारायण बाहेती यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श विद्यार्थ्यासमोर मांडला 


    एक पेड माँ के नाम व एक सेल्फी पेड के साथ विषय घेऊन विद्यार्थ्यांनी वृक्षा चे संगोपन करून संगोपनाची माहिती यशश्री जनकल्याण फाउंडेशन ला पुरवावी. एक वर्ष नंतर त्या विद्यार्थ्यांचा यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने मौलिक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात येईल असे यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी म्हटले.


 प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत खत्री यांनी केले. कार्यकमाची सांगता सर्व वृक्ष विद्यार्थी व पालकांना वितरण करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे सदस्य तसेच माँ सारदा ज्ञानपीठ विद्यालय चेशिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले

आभार प्रदर्शन यशश्री जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी केले.

टिप्पण्या