मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे काळाची गरज.. डॅा वासुदेव गोलाईत

 


 नांदुरा, दि. 7 - आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील यशासाठी सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) ची नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच संवाद कौशल्ये (Communication Skills), समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Skills), सांघिक कार्य (Teamwork) आणि लवचिकता (Adaptability) यांसारख्या गुणांवर भर देणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डॉक्टर वासुदेव गोलाईत यांनी केले. 

स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथील वाणिज्य शाखेच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनात Student Induction Program अंतर्गत  "पुस्तकांच्या पलीकडे: विद्यार्थ्यांच्या यशात सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता " या विषयावर प्रमुख वक्ते एम ई एस महाविद्यालय मेहकर येथील प्रा. डॅा. वासुदेव गोलाईत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर होत्या. याप्रसंगी विचार मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, मराठी विभाग प्रमुख प्रा अनंता लाहुडकर, प्रा सुप्रिया गेडाम उपस्थित होते. पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.

अध्यक्षीय भाषणात डॅा अलका मानकर यांनी सांगितले की, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे व्यावसायिक आणि नागरिक आहेत. त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा सुप्रीया गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा निलकेश धुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या