मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे काळाची गरज.. डॅा वासुदेव गोलाईत

 


 नांदुरा, दि. 7 - आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील यशासाठी सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) ची नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच संवाद कौशल्ये (Communication Skills), समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Skills), सांघिक कार्य (Teamwork) आणि लवचिकता (Adaptability) यांसारख्या गुणांवर भर देणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डॉक्टर वासुदेव गोलाईत यांनी केले. 

स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथील वाणिज्य शाखेच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनात Student Induction Program अंतर्गत  "पुस्तकांच्या पलीकडे: विद्यार्थ्यांच्या यशात सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता " या विषयावर प्रमुख वक्ते एम ई एस महाविद्यालय मेहकर येथील प्रा. डॅा. वासुदेव गोलाईत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर होत्या. याप्रसंगी विचार मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, मराठी विभाग प्रमुख प्रा अनंता लाहुडकर, प्रा सुप्रिया गेडाम उपस्थित होते. पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.

अध्यक्षीय भाषणात डॅा अलका मानकर यांनी सांगितले की, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे व्यावसायिक आणि नागरिक आहेत. त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा सुप्रीया गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा निलकेश धुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या