मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे काळाची गरज.. डॅा वासुदेव गोलाईत

 


 नांदुरा, दि. 7 - आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील यशासाठी सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) ची नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच संवाद कौशल्ये (Communication Skills), समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Skills), सांघिक कार्य (Teamwork) आणि लवचिकता (Adaptability) यांसारख्या गुणांवर भर देणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डॉक्टर वासुदेव गोलाईत यांनी केले. 

स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथील वाणिज्य शाखेच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनात Student Induction Program अंतर्गत  "पुस्तकांच्या पलीकडे: विद्यार्थ्यांच्या यशात सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता " या विषयावर प्रमुख वक्ते एम ई एस महाविद्यालय मेहकर येथील प्रा. डॅा. वासुदेव गोलाईत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर होत्या. याप्रसंगी विचार मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, मराठी विभाग प्रमुख प्रा अनंता लाहुडकर, प्रा सुप्रिया गेडाम उपस्थित होते. पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.

अध्यक्षीय भाषणात डॅा अलका मानकर यांनी सांगितले की, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे व्यावसायिक आणि नागरिक आहेत. त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा सुप्रीया गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा निलकेश धुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या