अकोला : विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापन दिन अमरावती येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी आमदार प्रताप दादा अडसड माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण सह मंचावर उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विदर्भातील प्रकल्पग्रस्ताच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांचा ऐतिहासिक लढा खऱ्या अर्थाने विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी झाला.मी एक जनप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य पोटतिडकीने पार पाडलं याचा मला अभिमान वाटतो मला याचे समाधान असल्याचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की मानुस आपला असला तर निश्चितच कामं होतात. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्याने विदर्भातील हजारो सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.
संघटनेचा संघर्ष व नेतृत्व अत्यंत प्रखर व नैतिक दृष्ट्या प्रबळ असल्याने हे शक्य झाले असल्याचे आमदार अडसड यांनी सांगितले. संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने जो संघर्षाचा खडतर प्रवास केला तो अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत केला आहे. संघटनेच्या ऐतिहासिक आंदोलनाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असुन प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला हा महाराष्ट्रातील पहिला व ऐतिहासिक निर्णय आहे.
मनोज भाऊ चव्हाण सारखं नेतृत्व विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना मीळालं हे खऱ्या अर्थाने भविष्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विजयाची चाहूल असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन बोलताना सांगितले. संघटनेचा वर्धापन दिन व मनोज भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस हा संयुक्तीक संयोग असल्याचे सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव बोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले
मनोज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सांगितले की चळवळीत एकीआणी नेकी असली तर अशक्य काम शक्य करता येत.प्रकल्पग्रस्तांच्या शेवटच्या समस्यांपर्यंत संघर्ष सुरूच राहिल.या संघर्षामध्ये प्रताप दादा सुरेखाताई अशा सरळ सुस्वभावी नेत्यांची प्रामाणिक साथ आम्हाला लाभली हे खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांसाठी सुदैवाची बाब आहे. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्त घटकाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हि चळवळ याच ताकदीने सुरू ठेवण्याचा विश्वास मनोज चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.
यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.तसेच गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण विदर्भातील वयोवृद्ध महिला पुरुषांनी या संघर्षामध्ये अविरत असे योगदान दिले अशा शंभरहून अधिक प्रकल्पग्रस्तांचा सत्कार सुध्दा संघटनेनं केला यावेळी अनेकांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहताना दिसुन आले.
अत्यंत भावनिक व विलोभनीय दृश्य या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहायला मिळाले.मनोज चव्हाण यांचा वाढदिवस व संघटनेचा वर्धापन दिनाचा केक प्रताप दादा अडसड व सुरेखाताई यांच्या उपस्थितीत मनोजभाऊंनी कापुन संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी संघटनेचे सहसचिव अजय भोयर कोषाध्यक्ष संजय गीद गौतम खंडारे राजु लोणकर राजाभाऊ काळे, प्रशांत मुरादे , रियाज पटेल प्रशांत ठाकरे,अरुण पाटील तायडे, गोवर्धन इंगोले, राजेश चौधरी नयन लूंगे शुभम डोणालकर,अभय जैन,अनिल खेडकर, अनिल मुंढे, नितीन मलमकार, डॉ भगवान पंडीत महादेव ठाकरे अतुल मुळे चंद्रशेखर सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा निलेश ठाकरे यांनी केले तर संचलन श्रीकृष्ण बैलमारे यांनी केले आभार अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रशांत मुरादे यांनी मानले.