मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

  अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले. स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन...

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताची जय्यत तयारी

 



अकोला : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी राज राजेश्वर नगरीमध्ये प्रथमच येत आहेत. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

 अकोला ग्रामीण, अकोला शहर, अमरावती शहर अमरावती ग्रामीण, खामगाव बुलढाणा पुसद यवतमाळ वाशिम या नऊ जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे आगमन होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्व पदाधिकारी, मंत्री, आमदार लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने विजय अग्रवाल, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, सुहासिनी धोत्रे, चंदा शर्मा, सुमन गावंडे, वैशाली निकम, वैशाली शेळके, वसंत बाचोका, गीतांजली शेगोकार, डॉक्टर अमित कावरे, गिरीश जोशी डॉक्टर अभय जैन, सिद्धार्थ शर्मा, संजय जोशी, अंबादास उमाळे, तुषार ,भिरड, गोपाल मुळे, रंजीत खेडकर, दिलीप गावंडे, नितीन राऊत अमोल गीते, नितीन नितेश पाली, गणेश लोड ,किशोर, कुचके, रमेश दुतोडे, हरीश तावरे संजय कोरडे, विठ्ठल वाकोडे, प्रशांत ठाकरे, हर्षद साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

टिप्पण्या