मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले



अकोला : जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पहलगाम पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या चार ते पाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटक ठार झाले. या हल्ल्याचा जानकी वल्लभो सरकार संस्थेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 यामध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने ही या पर्यटकांची नावे आहेत. अजून महाराष्ट्रातील दोन पर्यटक जखमी आहेत.  हल्ल्यातील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस इंडिया आघाडीच्या सरकारचा निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या घटनेची दखल घेतली असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

आज अनिल मानधने यांच्या अध्यक्षतेखाली मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  प्रभू रामचंद्राच्या चरणी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी व आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकारला ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या हिंदू टार्गेट किलिंगचा बदला निश्चित घेतल्या जाईल  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे . 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा हे सुरक्षा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यासमवेत बैठक घेत असून दहशत वाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली  आहे. 

या सभेमध्ये श्री गिरीशजी जोशी, सुमन देवी अग्रवाल, विनायक शांडील्य गुरुजी, गिरीराज तिवारी प्रशांत लोहिया श्रीधर तिवारी अजय  गुल्हाने, आशिष बजाज, माधव मानकर संजय जीरापुरे निलेश निनोरे, कविता मानधने, मीरा वानखडे ज्योती शर्मा, मालती रणपिसे, विनोद मोरे, संजय गांधी, संगीता पाटील, सुजाता गांधी, रोहित तारका, संजय देशमुख एडवोकेट धनराज ,दादळे, निकु जोशी उपस्थित होते.

टिप्पण्या