मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

  अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले. स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन...

चार दिवसात जलकुंभी काढा गिरीश जोशी यांचा मनपायुक्तांना अल्टिमेटम

 


अकोला : मोर्णा नदीमध्ये जलकुंभी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या प्रश्नावरून भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आक्रमक झाले आहेत.  महानगरपालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात मोर्णा नदीवरील जलकुंभी न काढल्यास त्यांच्या निवासस्थानी नदीकाठीचे नागरिक झोपण्यासाठी अभिनव पद्धतीने आंदोलन करतील असा इशारा माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला. 

अकोला महानगरपालिकेने जलकुंभी कार्ड सुरू केले आहे अशा प्रकारचा प्रचार केला, परंतु प्रत्यक्षात जलकुंभी काढण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील प्रभाग 10 मधील नागरिक डासांच्या त्रासापासून त्रस्त आहेत. रात्री त्यांना झोपण्यामध्ये अनेक अडचणी येत असून रोगराई पसरत आहे. या संदर्भात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या निवासस्थानी जलकुंभी त्रस्त नागरिक  झोपण्यासाठी जन आंदोलन करतील. येत्या चार दिवसात यासंदर्भात कारवाई न केल्यास  आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. वारंवार भाजपा लोकप्रतिनिधींनी सूचना दिल्यावर सुद्धा केवळ वृत्तपत्रात प्रचार प्रसार करून जलकुंभी काढण्याचे  नाटक करण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख गिरीश जोशी यांनी सांगितले.

टिप्पण्या