मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अकोल्यात येऊन गेले?

https://194888.click-allow.top/



भाजप तर्फे कोणाला तिकीट देण्यात येते याची अनेकांना उत्सुकता 




अकोला : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अजित (Ajit) चव्हाण सोमवारीअकोला शहरात येऊन गेले. 




अकोला पश्चिम चे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर भाजप तर्फे कोणाला तिकीट (tikit)देण्यात येते याची अनेकांना उत्सुकता आहे.


 अचानक अजित चव्हाण यांचा दौरा झाल्याने अकोला पूर्व व अकोला (AKOLA)पश्चिम मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी आले होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.


यंदा भारतीय जनता पार्टीतर्फे विधानसभेच्या निवडणुकीत विविध मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोला दौऱ्यावर असतांना त्यांनी भाजप(bjp) युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


यावेळी उपस्थितांशी त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला.राज्य विधानसभा निवडणुका तोंडावर असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.


त्यामुळे सर्वच राजकिय पक्षातील मोठ्या नेत्यांचे दौरे राज्यभरात सुरू आहेत.सर्वच क्षेत्रातील मतदारांशी यामाध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. 


दरम्यान आजच्या भेटीत चव्हाण यांना किरण पाटील यांनी आपला कार्य अहवाल सादर केला.


यावेळी प्रा.अंधारे, योगेश सरोदे, निखिल सहारकर, मनीष कोकाटे, प्रतीक कराळे, प्रसाद देशमुख, सोमू शेलकर, भूषण बोन्द्रे, शंकर शिंदे, सतीश भोसले, राहुल नागरे, मनीष भोसले, विठ्ठल काळदाते, सागर गायकवाड, ओम काळे, पार्थ वानखडे, मयूर धारस्कार, अमर ठाकरे, समीर धोत्रे, संकेत काळे, दिनेश काटे, मधुर अवताडे, शिवनेरी अवताडे, डॉ. ऋषिकेश अंधारे, राजू मुंगीकर आदी उपस्थित होते.




टिप्पण्या