मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

  अमरावती : उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकरीच आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या  माजी  अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले.नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेखाताई ठाकरे यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते.  महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असुन प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे. संघटनेच्या दिर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्र...

मी पाहिलेले धिवरे साहेब

 


मी गेल्या कित्येक वर्षापासून अकोल्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

सुधीर धिवरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. मी बातमीच्या निमित्ताने अधून मधून भेटीला जात असे. एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असून सुध्दा स्वभाव एकदम साधा. काही लोक असे असतात की त्यांची भेट झाल्यावर आनंद होतो. धिवरे साहेब त्यातीलच एक. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व. विविध क्षेत्रातील, विविध विषयांचा सखोल अभ्यास. एवढे असूनही अजिबात गर्व नाही. भेटीला आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते ऐकून घेत. अशा माणुसकी धर्म जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे. मध्यंतरी सरांना फोन केला तेव्हा ते जळगाव खानदेशला होते. आज अचानक आठवण झाली...फोन लावून पहिला. साहेब म्हणाले मी सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झाले. सेवानिवृत्त झाले हे वास्तव असले तरी मनाला पटत नाही. ते दिवस पुन्हा आठवले.. सा.बा.विभागात कार्यकारी अभियंता चेंबर समोर पांढरी शुभ्र कार वेगात यायची. साहेब झपझप पावले टाकत त्यांच्या कक्षात जात. मागून शिपाई त्यांची बॅग घेऊन जात असे. ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले, साहेबांच्या आठवणी एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाने जिवंत झाल्या. आता पुन्हा कधी भेट होईल? पुन्हा तशाच गप्पा मारता येतील? साहेब आता कसे असतील? असे अनेक प्रश्न पुन्हा उभे राहिले.

टिप्पण्या