मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अखेर बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्षा फळाला, 28 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु

                                - विशाल पुरंदरे - चांदुर बाजार -- तालुक्यातील बोर्डी नाला प्रकल्पातील 2006 ते 2013 या कालावधीत सरळ खरेदी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अत्यंत कमी दराने जमीनी खरेदी करण्यात आल्या होत्या. दरम्यान या शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याचा संवैधानिक अधिकार सुध्दा तत्कालीन सरकारने शिल्लक ठेवला नव्हता.त्यामुळे न्यायाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी सोडली होती.मात्र मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने बारा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षा नंतर अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति हेक्टरी पाच लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदानाला नियामक मंडळाच्या माध्यमातून मंजुरी देऊन विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना एकुण आठशे बत्तीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळवून दिला. गेल्याच वर्षी 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनादेश वितरणाचा शुभारंभ अमरावती मधुन केला होता. तेव्हापासुन राज...

मी पाहिलेले धिवरे साहेब

 


मी गेल्या कित्येक वर्षापासून अकोल्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

सुधीर धिवरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. मी बातमीच्या निमित्ताने अधून मधून भेटीला जात असे. एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असून सुध्दा स्वभाव एकदम साधा. काही लोक असे असतात की त्यांची भेट झाल्यावर आनंद होतो. धिवरे साहेब त्यातीलच एक. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व. विविध क्षेत्रातील, विविध विषयांचा सखोल अभ्यास. एवढे असूनही अजिबात गर्व नाही. भेटीला आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते ऐकून घेत. अशा माणुसकी धर्म जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे. मध्यंतरी सरांना फोन केला तेव्हा ते जळगाव खानदेशला होते. आज अचानक आठवण झाली...फोन लावून पहिला. साहेब म्हणाले मी सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झाले. सेवानिवृत्त झाले हे वास्तव असले तरी मनाला पटत नाही. ते दिवस पुन्हा आठवले.. सा.बा.विभागात कार्यकारी अभियंता चेंबर समोर पांढरी शुभ्र कार वेगात यायची. साहेब झपझप पावले टाकत त्यांच्या कक्षात जात. मागून शिपाई त्यांची बॅग घेऊन जात असे. ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले, साहेबांच्या आठवणी एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाने जिवंत झाल्या. आता पुन्हा कधी भेट होईल? पुन्हा तशाच गप्पा मारता येतील? साहेब आता कसे असतील? असे अनेक प्रश्न पुन्हा उभे राहिले.

टिप्पण्या