मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

  अमरावती : उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकरीच आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या  माजी  अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले.नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेखाताई ठाकरे यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते.  महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असुन प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे. संघटनेच्या दिर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्र...

आदिवासी, पारधी बांधवांच्या रंगोत्सवात आमदार सावरकर सहभागी

 



अकोला : भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती, पारधी वाडा, देवरी फाटा येथे होळी व रंगपंचमीचा उत्सव साजरा केला.


राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शताब्दी वर्षांमध्ये पीडित, वंचित समाज बांधवांसोबत आदिवासी समाजासोबत होळी साजरी करून त्यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला. गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही परंपरा आमदार सावरकर अंगीकार करत आहे.  


शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबध्द


यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार रणधीर सावरकरांनी सांगितले. त्याचप्रमाणे तळागाळातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वर्षभरातील रुसवे फुगवे विसरून सर्वांनी एकत्र यावे हाच रंग पंचमी साजरी करण्याचा उद्देश आहे असे ते म्हणाले.


मिठाईचे केले वाटप 


याप्रसंगी अमरसिंग भोसले, विजयसिंह सोळंके, विवेक भरणे, राजेश नागमते, मधुकर पाटकर, विनोद मंगले, किशोर सरोदे, विठ्ठल वाकोडे, प्रवीण डिक्कर उपस्थित होते. आमदार सावरकर यांनी मिठाई वाटून उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.

टिप्पण्या