मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

वनविभागाचा हलगर्जीपणा; आमदार अमोल मिटकरी आक्रमक

 


अकोला : अकोला जिल्ह्यातील मौजे वरखेड–सौंदळा, ता. तेल्हारा येथील शेतशिवार परिसरात वाघाच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात उपस्थित केला.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष विनोद मिरगे यांनी ही बाब आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला.


तेल्हारा तालुक्यातील वरखेड–सौंदळा शिवारात वाघाची हालचाल


दिनांक ११ मार्च रोजी वरखेड–सौंदळा शिवारात वाघाने चार गुरे व एका डुकराची शिकार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असता त्यामध्ये वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाल्याची नोंद आहे. तसेच १३ मार्च रोजी पुन्हा त्या परिसरात वाघ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे वाघाला तात्काळ पकडण्याची मागणी केली. मात्र “जोपर्यंत एखाद्या माणसावर हल्ला होत नाही, तोपर्यंत वाघ पकडता येणार नाही,” अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याची बाब समोर आली आहे.


या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात वनविभागाच्या हलगर्जीपणाकडे सरकारचे लक्ष वेधले. नागरिकांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला असताना वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.


तसेच एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणाऱ्या निष्क्रिय आणि हलगर्जी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार मिटकरी यांनी यावेळी केली.

टिप्पण्या