मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

नगरसेवक गिरीश गोखलेंकडून अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या

  अकोला : भारतीय जनता पार्टीतर्फे नुकतीच अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी गिरीश गोखले यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरपालिकेत एक अभ्यासपूर्ण नेता आल्याने अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया. अकोट स्टॅन्ड रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी माणिक टॉकीज ते अग्रसेन चौकापर्यंत डांबरी रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. रस्ता खराब झाल्याने कित्येकदा किरकोळ अपघात होतात. हा रस्ता त्वरित नव्याने तयार करावा. त्याचप्रमाणे निदान दोन-तीन दिवसातून एकदा का होईना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. शहरातील मोकाट कुत्रे, वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता राखण्यात यावी, या दृष्टीने गोखले प्रयत्न करतील अशी आशा आहे. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा ! - एडवोकेट मोतीसिंह मोहता,  ज्येष्ठ विधीज्ञ, अध्यक्ष बेरार एज्युकेशन सोसायटी अकोला --------------------------------- मोठमोठे उद्योग अकोल्यात यावेत असे मनपाने धोरण आखावे  अकोला शहरात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. त्यासाठी मोठमोठे...

वनविभागाचा हलगर्जीपणा; आमदार अमोल मिटकरी आक्रमक

 


अकोला : अकोला जिल्ह्यातील मौजे वरखेड–सौंदळा, ता. तेल्हारा येथील शेतशिवार परिसरात वाघाच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात उपस्थित केला.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष विनोद मिरगे यांनी ही बाब आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला.


तेल्हारा तालुक्यातील वरखेड–सौंदळा शिवारात वाघाची हालचाल


दिनांक ११ मार्च रोजी वरखेड–सौंदळा शिवारात वाघाने चार गुरे व एका डुकराची शिकार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असता त्यामध्ये वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाल्याची नोंद आहे. तसेच १३ मार्च रोजी पुन्हा त्या परिसरात वाघ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे वाघाला तात्काळ पकडण्याची मागणी केली. मात्र “जोपर्यंत एखाद्या माणसावर हल्ला होत नाही, तोपर्यंत वाघ पकडता येणार नाही,” अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याची बाब समोर आली आहे.


या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात वनविभागाच्या हलगर्जीपणाकडे सरकारचे लक्ष वेधले. नागरिकांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला असताना वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.


तसेच एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणाऱ्या निष्क्रिय आणि हलगर्जी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार मिटकरी यांनी यावेळी केली.

टिप्पण्या