वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वनविभागाचा हलगर्जीपणा; आमदार अमोल मिटकरी आक्रमक
अकोला : अकोला जिल्ह्यातील मौजे वरखेड–सौंदळा, ता. तेल्हारा येथील शेतशिवार परिसरात वाघाच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष विनोद मिरगे यांनी ही बाब आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला.
तेल्हारा तालुक्यातील वरखेड–सौंदळा शिवारात वाघाची हालचाल
दिनांक ११ मार्च रोजी वरखेड–सौंदळा शिवारात वाघाने चार गुरे व एका डुकराची शिकार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असता त्यामध्ये वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाल्याची नोंद आहे. तसेच १३ मार्च रोजी पुन्हा त्या परिसरात वाघ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे वाघाला तात्काळ पकडण्याची मागणी केली. मात्र “जोपर्यंत एखाद्या माणसावर हल्ला होत नाही, तोपर्यंत वाघ पकडता येणार नाही,” अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याची बाब समोर आली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात वनविभागाच्या हलगर्जीपणाकडे सरकारचे लक्ष वेधले. नागरिकांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला असताना वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणाऱ्या निष्क्रिय आणि हलगर्जी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार मिटकरी यांनी यावेळी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा