मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित थांबवावा - गिरीश जोशी यांचा इशारा

 



अकोला : जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे ऊर्जेच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने आधीच दूरदृष्टी ठेवून तयारी केली आहे.

चार वेगवेगळ्या देशांकडून एलपीजीने भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे देशातील गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्वनियोजन केले असल्याचे स्पष्ट दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोरण स्वीकारले आहे. विविध देशांशी ऊर्जा करार, आयात स्रोतांचे विविधीकरण आणि साठवण क्षमता वाढवणे या माध्यमातून भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे.

म्हणूनच जागतिक परिस्थिती कठीण असतानाही भारतासाठी एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा. विरोधकांनी विनाकारण खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित बंद करावा असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री गिरीशजी जोशी यांनी दिला आहे.


टिप्पण्या