वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित थांबवावा - गिरीश जोशी यांचा इशारा
अकोला : जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे ऊर्जेच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने आधीच दूरदृष्टी ठेवून तयारी केली आहे.
चार वेगवेगळ्या देशांकडून एलपीजीने भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे देशातील गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्वनियोजन केले असल्याचे स्पष्ट दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोरण स्वीकारले आहे. विविध देशांशी ऊर्जा करार, आयात स्रोतांचे विविधीकरण आणि साठवण क्षमता वाढवणे या माध्यमातून भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे.
म्हणूनच जागतिक परिस्थिती कठीण असतानाही भारतासाठी एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा. विरोधकांनी विनाकारण खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित बंद करावा असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री गिरीशजी जोशी यांनी दिला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा