मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

नगरसेवक गिरीश गोखलेंकडून अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या

  अकोला : भारतीय जनता पार्टीतर्फे नुकतीच अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी गिरीश गोखले यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरपालिकेत एक अभ्यासपूर्ण नेता आल्याने अकोलेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया. अकोट स्टॅन्ड रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी माणिक टॉकीज ते अग्रसेन चौकापर्यंत डांबरी रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे. रस्ता खराब झाल्याने कित्येकदा किरकोळ अपघात होतात. हा रस्ता त्वरित नव्याने तयार करावा. त्याचप्रमाणे निदान दोन-तीन दिवसातून एकदा का होईना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. शहरातील मोकाट कुत्रे, वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता राखण्यात यावी, या दृष्टीने गोखले प्रयत्न करतील अशी आशा आहे. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा ! - एडवोकेट मोतीसिंह मोहता,  ज्येष्ठ विधीज्ञ, अध्यक्ष बेरार एज्युकेशन सोसायटी अकोला --------------------------------- मोठमोठे उद्योग अकोल्यात यावेत असे मनपाने धोरण आखावे  अकोला शहरात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. त्यासाठी मोठमोठे...

विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित थांबवावा - गिरीश जोशी यांचा इशारा

 



अकोला : जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे ऊर्जेच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने आधीच दूरदृष्टी ठेवून तयारी केली आहे.

चार वेगवेगळ्या देशांकडून एलपीजीने भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे देशातील गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्वनियोजन केले असल्याचे स्पष्ट दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोरण स्वीकारले आहे. विविध देशांशी ऊर्जा करार, आयात स्रोतांचे विविधीकरण आणि साठवण क्षमता वाढवणे या माध्यमातून भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे.

म्हणूनच जागतिक परिस्थिती कठीण असतानाही भारतासाठी एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा. विरोधकांनी विनाकारण खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग त्वरित बंद करावा असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री गिरीशजी जोशी यांनी दिला आहे.


टिप्पण्या