मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

मी पाहिलेले धिवरे साहेब

  मी गेल्या कित्येक वर्षापासून अकोल्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे.  सुधीर धिवरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. मी बातमीच्या निमित्ताने अधून मधून भेटीला जात असे. एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असून सुध्दा स्वभाव एकदम साधा. काही लोक असे असतात की त्यांची भेट झाल्यावर आनंद होतो. धिवरे साहेब त्यातीलच एक. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व. विविध क्षेत्रातील, विविध विषयांचा सखोल अभ्यास. एवढे असूनही अजिबात गर्व नाही. भेटीला आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते ऐकून घेत. अशा माणुसकी धर्म जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांची आज देशाला गरज आहे. मध्यंतरी सरांना फोन केला तेव्हा ते जळगाव खानदेशला होते. आज अचानक आठवण झाली...फोन लावून पहिला. साहेब म्हणाले मी सेवानिवृत्त होऊन चार वर्ष झाले. सेवानिवृत्त झाले हे वास्तव असले तरी मनाला पटत नाही. ते दिवस पुन्हा आठवले.. सा.बा.विभागात कार्यकारी अभियंता चेंबर समोर पांढरी शुभ्र कार वेगात यायची. साहेब झपझप पावले टाकत त्यांच्या कक्षात जात. मागून शिपाई त्यांची बॅग घेऊन जात असे. ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले, साहेबांच्या आठ...

मी पाहिलेले संजय खडसे

 



संजय खडसे या नावाला परिचयाची गरज नाही. 'नाम ही काफी है' हे वाक्य खडसे सरांच्या बाबतीत लागू पडते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर आपण त्यांना पाहिले. मात्र मी संजय खडसे यांच्यातला माणूस पहिला.


अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना तासनतास कामात व्यस्त. टेबलवर फाईल्स चा ढिगारा पडलेला. तरी कामाचा कधी कंटाळा नाही. कितीही काम असेल मात्र समोर बसलेला शेतकरी आपल्या भेटीसाठी 60 किलोमीटर वरून आला आहे , याची जाण असणारा अधिकारी. 


माझी आणि खडसे साहेबांची पहिल्यांदा भेट कधी झाली हे नीट आठवत नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना शेकडो अधिकारी संपर्कात आले. मात्र खडसे साहेबासारखा उमद्या मनाचा अधिकारी विरळाच. भेटीसाठी येणारे लोकप्रतिनिधी असो व्यापारी, उद्योगपती किंवा सामान्य शेतकरी सर्वांना सारखीच वागणूक. समोर बसलेला माणूस काहीतरी तक्रार किंवा मागणी घेऊन आलेला आहे. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच अपेक्षा असते.


 अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर सुद्धा तक्रारीचे निवारण झाले नाही की अनेकजण खडसे साहेबांच्या भेटीला येत. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत. दिवसभर सरकारी कामाचा डोलारा सांभाळून सुध्दा सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे. 


प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलची गाडी न वापरता सायकल वापरा हा संदेश द्यायचा होता. त्यासाठी केवळ बोलून होणार नाही. म्हणून त्यांनी दर रविवारी सायकल चालविणे सुरू केले. पाहता पाहता अकोल्यात सायकल चालविणाऱ्या युवकांचा मोठा ग्रुप तयार झाला. 


बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांचे समाजाभिमुख कार्य लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कृत केले.


 याव्यतिरिक्त कितीतरी संस्था, संघटनांनी त्यांचा सत्कार केला याची मोजदाद होणार नाही. एखादा प्रसिद्ध नेता, अभिनेत्यापेक्षा त्यांची लोकप्रियता कमी नाही. अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना ईश्वराने अधिक बळ द्यावे.

टिप्पण्या