मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

  अमरावती : उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकरीच आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या  माजी  अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले.नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेखाताई ठाकरे यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते.  महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असुन प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे. संघटनेच्या दिर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्र...

मी पाहिलेले संजय खडसे

 



संजय खडसे या नावाला परिचयाची गरज नाही. 'नाम ही काफी है' हे वाक्य खडसे सरांच्या बाबतीत लागू पडते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर आपण त्यांना पाहिले. मात्र मी संजय खडसे यांच्यातला माणूस पहिला.


अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना तासनतास कामात व्यस्त. टेबलवर फाईल्स चा ढिगारा पडलेला. तरी कामाचा कधी कंटाळा नाही. कितीही काम असेल मात्र समोर बसलेला शेतकरी आपल्या भेटीसाठी 60 किलोमीटर वरून आला आहे , याची जाण असणारा अधिकारी. 


माझी आणि खडसे साहेबांची पहिल्यांदा भेट कधी झाली हे नीट आठवत नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना शेकडो अधिकारी संपर्कात आले. मात्र खडसे साहेबासारखा उमद्या मनाचा अधिकारी विरळाच. भेटीसाठी येणारे लोकप्रतिनिधी असो व्यापारी, उद्योगपती किंवा सामान्य शेतकरी सर्वांना सारखीच वागणूक. समोर बसलेला माणूस काहीतरी तक्रार किंवा मागणी घेऊन आलेला आहे. त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच अपेक्षा असते.


 अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर सुद्धा तक्रारीचे निवारण झाले नाही की अनेकजण खडसे साहेबांच्या भेटीला येत. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत. दिवसभर सरकारी कामाचा डोलारा सांभाळून सुध्दा सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे. 


प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलची गाडी न वापरता सायकल वापरा हा संदेश द्यायचा होता. त्यासाठी केवळ बोलून होणार नाही. म्हणून त्यांनी दर रविवारी सायकल चालविणे सुरू केले. पाहता पाहता अकोल्यात सायकल चालविणाऱ्या युवकांचा मोठा ग्रुप तयार झाला. 


बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांचे समाजाभिमुख कार्य लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कृत केले.


 याव्यतिरिक्त कितीतरी संस्था, संघटनांनी त्यांचा सत्कार केला याची मोजदाद होणार नाही. एखादा प्रसिद्ध नेता, अभिनेत्यापेक्षा त्यांची लोकप्रियता कमी नाही. अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना ईश्वराने अधिक बळ द्यावे.

टिप्पण्या