मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : अनुप धोत्रे यांची बाजार समितीला भेट

 



अकोला : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार अनुप धोत्रे यांनी भेट देऊन सभापती श्री. शिरीषभाऊ धोत्रे यांच्यासोबत केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेती उपयोगी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.

अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच अल्पभूधारक शेतकरी सततच्या नापिकीला कंटाळले आहेत. आपण स्वतः शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करत असून याविषयी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.



यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिरीष भाऊ धोत्रे यांनी बाजार समितीच्या आजपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ, शेतमाल बाजारपेठेपर्यंत सुलभ रीतीने पोहोचविणे आणि शेतीत तंत्रज्ञानाचा अधिक वापर यावर भर देण्यात आला.

या प्रसंगी राजेश बेले, वैभव माहोरे, अंकुश इंगळे, हर्षल गोंडचोर व निलेश फोकमारे उपस्थित होते.




टिप्पण्या