मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये : आ. सावरकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश



अकोला : अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेज मध्ये 24 जिल्ह्यातील विशेषता पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील काही तालुके सुटले. ही बाब लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांची भेट घेतली. शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान खपवून घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.https://youtu.be/YYdmYyQl66E?si=qmvhYMXBafI3iVQo



या संदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महसूल सचिव रागिनी सिंगल तसेच संपत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविल्या. शासन या संदर्भात लवकरच सुधारित जीआर काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.


 

आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भ्रमणध्वनीवर विभागीय आयुक्त, महसूल मंत्री, महसूल सचिव, कृषी मंत्री, कृषी सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना तसेच अकोला जिल्ह्यातील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुके अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके वाशिम जिल्ह्यातील चार तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आठ, तालुके यांचा समावेश नसल्याबद्दल निदर्शनास आणून दिले.



 खासदार अनुप धोत्रे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उप विभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे, कृषी अधिकारी किरवे तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 



यावेळी संतोष शिवरकर किशोर पाटील,डॉक्टर अमित कावरे, अंबादास उमाळे, माधव मानकर, शंकरराव वाकोडे, विठ्ठल वाकोडे, राजेश बेले , पंकज वाडी वाले अनिल गावंडे दिगंबर गावंडे संजय गावंडे गोविंद गोयंका, चंद्रकांत अंधारे गिरीश जोशी संजय जोशी गणेश लोड संजय कोरडे वैभव माहोरे, सुबोध गवई, सागर तायडे जय कृष्ण ठोकळ प्रशांत ठाकरे, रवी गावंडे राजेश ठाकरे किरण थोरात, विठ्ठल चतरकर, अनमोल गावंडे, डॉक्टर किरण ठाकरे सुलभा सोळंके आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पण्या