मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये : आ. सावरकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश



अकोला : अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेज मध्ये 24 जिल्ह्यातील विशेषता पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील काही तालुके सुटले. ही बाब लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांची भेट घेतली. शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान खपवून घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.https://youtu.be/YYdmYyQl66E?si=qmvhYMXBafI3iVQo



या संदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महसूल सचिव रागिनी सिंगल तसेच संपत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविल्या. शासन या संदर्भात लवकरच सुधारित जीआर काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.


 

आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भ्रमणध्वनीवर विभागीय आयुक्त, महसूल मंत्री, महसूल सचिव, कृषी मंत्री, कृषी सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना तसेच अकोला जिल्ह्यातील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुके अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके वाशिम जिल्ह्यातील चार तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आठ, तालुके यांचा समावेश नसल्याबद्दल निदर्शनास आणून दिले.



 खासदार अनुप धोत्रे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उप विभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे, कृषी अधिकारी किरवे तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 



यावेळी संतोष शिवरकर किशोर पाटील,डॉक्टर अमित कावरे, अंबादास उमाळे, माधव मानकर, शंकरराव वाकोडे, विठ्ठल वाकोडे, राजेश बेले , पंकज वाडी वाले अनिल गावंडे दिगंबर गावंडे संजय गावंडे गोविंद गोयंका, चंद्रकांत अंधारे गिरीश जोशी संजय जोशी गणेश लोड संजय कोरडे वैभव माहोरे, सुबोध गवई, सागर तायडे जय कृष्ण ठोकळ प्रशांत ठाकरे, रवी गावंडे राजेश ठाकरे किरण थोरात, विठ्ठल चतरकर, अनमोल गावंडे, डॉक्टर किरण ठाकरे सुलभा सोळंके आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट