मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये : आ. सावरकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश



अकोला : अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेज मध्ये 24 जिल्ह्यातील विशेषता पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील काही तालुके सुटले. ही बाब लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांची भेट घेतली. शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान खपवून घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.https://youtu.be/YYdmYyQl66E?si=qmvhYMXBafI3iVQo



या संदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महसूल सचिव रागिनी सिंगल तसेच संपत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविल्या. शासन या संदर्भात लवकरच सुधारित जीआर काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.


 

आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भ्रमणध्वनीवर विभागीय आयुक्त, महसूल मंत्री, महसूल सचिव, कृषी मंत्री, कृषी सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना तसेच अकोला जिल्ह्यातील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुके अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके वाशिम जिल्ह्यातील चार तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आठ, तालुके यांचा समावेश नसल्याबद्दल निदर्शनास आणून दिले.



 खासदार अनुप धोत्रे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उप विभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे, कृषी अधिकारी किरवे तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 



यावेळी संतोष शिवरकर किशोर पाटील,डॉक्टर अमित कावरे, अंबादास उमाळे, माधव मानकर, शंकरराव वाकोडे, विठ्ठल वाकोडे, राजेश बेले , पंकज वाडी वाले अनिल गावंडे दिगंबर गावंडे संजय गावंडे गोविंद गोयंका, चंद्रकांत अंधारे गिरीश जोशी संजय जोशी गणेश लोड संजय कोरडे वैभव माहोरे, सुबोध गवई, सागर तायडे जय कृष्ण ठोकळ प्रशांत ठाकरे, रवी गावंडे राजेश ठाकरे किरण थोरात, विठ्ठल चतरकर, अनमोल गावंडे, डॉक्टर किरण ठाकरे सुलभा सोळंके आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पण्या