मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

श्री शिवाजी महाविद्यालयात ए आय कार्यशाळा उत्साहात संपन्न

 



अकोला : श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स जूनियर कॉलेज, अकोला येथे "आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती.


कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.मुख्य वक्ता म्हणून शांतनु गजानन जवंजाळ उपस्थित होते, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विविध पैलू, त्याचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग, तसेच भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



मुख्य वक्त्यांनी AI चा व्यवहारातील उपयोग, शिक्षण पद्धतीत त्याचा समावेश कसा करता येईल, आणि याच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी कसे बनवता येईल यावर उदाहरणांसह माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्राचार्य महोदयांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका प्रा. एस. एच. मळसणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



 प्रास्ताविक डॉ. अर्चना पोटे, संचालन डॉ. सोनाली चापके आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका रोहिणी भालेराव यांनी केले.

टिप्पण्या