काटी पाटी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव द्या आ. रणधीर सावरकर यांनी ठणकावले

VISHAL PURANDARE
By -
0

 



अकोला : विदर्भात विविध सिंचन प्रकल्पासाठी यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करण्यात आल्या. तसाच काहीसा प्रकार काटी पाटी येथील प्रकल्पा संदर्भात होत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसहित आमदार रणधीर सावरकर यांनी लघु पाटबंधारे विभागात धडक दिली. आधी शेतकऱ्यांच्या जमिनीला समाधानकारक भाव द्या नंतर अधिग्रहण करा अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.


शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये शेतकरी हा देशाचा आत्मा असून शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार तयार असताना अधिकाऱ्यांनी आठ काठी आणू नये असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पाठीशी आहेत. अधिकाऱ्यांनी नियमानुसार कामे करून योग्य तो मोबदला देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे ही बजावले.

https://youtube.com/@vishalpurandare-l1e?si=VeKbWHpdmzonxc85

  शेतकऱ्यांना मोबदला वाढवून देण्यात यावा याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे महसूल विभागात बैठक आयोजित केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष शिवरकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, विवेक भरणे, व काटी पाटी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)