मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

काटी पाटी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव द्या आ. रणधीर सावरकर यांनी ठणकावले

 



अकोला : विदर्भात विविध सिंचन प्रकल्पासाठी यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करण्यात आल्या. तसाच काहीसा प्रकार काटी पाटी येथील प्रकल्पा संदर्भात होत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसहित आमदार रणधीर सावरकर यांनी लघु पाटबंधारे विभागात धडक दिली. आधी शेतकऱ्यांच्या जमिनीला समाधानकारक भाव द्या नंतर अधिग्रहण करा अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.


शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये शेतकरी हा देशाचा आत्मा असून शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार तयार असताना अधिकाऱ्यांनी आठ काठी आणू नये असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पाठीशी आहेत. अधिकाऱ्यांनी नियमानुसार कामे करून योग्य तो मोबदला देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे ही बजावले.

https://youtube.com/@vishalpurandare-l1e?si=VeKbWHpdmzonxc85

  शेतकऱ्यांना मोबदला वाढवून देण्यात यावा याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे महसूल विभागात बैठक आयोजित केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष शिवरकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, विवेक भरणे, व काटी पाटी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या