मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

काटी पाटी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव द्या आ. रणधीर सावरकर यांनी ठणकावले

 



अकोला : विदर्भात विविध सिंचन प्रकल्पासाठी यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करण्यात आल्या. तसाच काहीसा प्रकार काटी पाटी येथील प्रकल्पा संदर्भात होत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसहित आमदार रणधीर सावरकर यांनी लघु पाटबंधारे विभागात धडक दिली. आधी शेतकऱ्यांच्या जमिनीला समाधानकारक भाव द्या नंतर अधिग्रहण करा अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.


शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये शेतकरी हा देशाचा आत्मा असून शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार तयार असताना अधिकाऱ्यांनी आठ काठी आणू नये असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पाठीशी आहेत. अधिकाऱ्यांनी नियमानुसार कामे करून योग्य तो मोबदला देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे ही बजावले.

https://youtube.com/@vishalpurandare-l1e?si=VeKbWHpdmzonxc85

  शेतकऱ्यांना मोबदला वाढवून देण्यात यावा याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे महसूल विभागात बैठक आयोजित केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष शिवरकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, विवेक भरणे, व काटी पाटी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या