मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने पती-पत्नीने घेतला जगाचा निरोप

 




अकोला : दहिगाव गावंडे येथील शालिकराम गावंडे हे अल्पभूधारक शेतकरी (वय 75) त्यांच्या पत्नी सुमन गावंडे (वय 69). अनेक वर्षापासून दोघांचा सुरळीत संसार सुरू होता. जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका अनेक जण घेतात, परंतु याचे जिवंत उदाहरण गावंडे दाम्पत्याचे आहे.

     सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शालिकरामजी गावंडे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मुलाने डॉक्टरांना बोलावले. प्रकृती चिंताजनक असून फारसे काही करण्यासारखे नाही हे डॉक्टरच्या लक्षात आले. त्यांनी कुटुंबीयांच्या परिस्थिती लक्षात आणून दिली. गावंडे यांना खाली सतरंजीवर ठेवण्यात आले. घरातील सर्व मंडळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत काही सुधारणा होते का या चिंतेत होते. मुलगा शंकर गावंडे रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी आई जवळ गेला. आईला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच हालचाल झाली नाही. वडील जाण्याच्या अवस्थेत असताना आईच सोडून गेली.

    हे पाहून, शंकर वडिलांजवळ गेला. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने म्हणजे एक वाजून 30 मिनिटांनी वडिलांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोघांच्या जाण्याने दहिगाव गावंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे सुपुत्र शंकर गावंडे हे सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे.


    

टिप्पण्या