मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने पती-पत्नीने घेतला जगाचा निरोप

 




अकोला : दहिगाव गावंडे येथील शालिकराम गावंडे हे अल्पभूधारक शेतकरी (वय 75) त्यांच्या पत्नी सुमन गावंडे (वय 69). अनेक वर्षापासून दोघांचा सुरळीत संसार सुरू होता. जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका अनेक जण घेतात, परंतु याचे जिवंत उदाहरण गावंडे दाम्पत्याचे आहे.

     सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शालिकरामजी गावंडे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मुलाने डॉक्टरांना बोलावले. प्रकृती चिंताजनक असून फारसे काही करण्यासारखे नाही हे डॉक्टरच्या लक्षात आले. त्यांनी कुटुंबीयांच्या परिस्थिती लक्षात आणून दिली. गावंडे यांना खाली सतरंजीवर ठेवण्यात आले. घरातील सर्व मंडळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत काही सुधारणा होते का या चिंतेत होते. मुलगा शंकर गावंडे रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी आई जवळ गेला. आईला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच हालचाल झाली नाही. वडील जाण्याच्या अवस्थेत असताना आईच सोडून गेली.

    हे पाहून, शंकर वडिलांजवळ गेला. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने म्हणजे एक वाजून 30 मिनिटांनी वडिलांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोघांच्या जाण्याने दहिगाव गावंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे सुपुत्र शंकर गावंडे हे सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे.


    

टिप्पण्या