मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

जेजुरीची झलक, मातीचा मल्हार गणपती

  

सुरभी व अभिषेक दोडके 

यांची आकर्षक सजावट

 





अकोला – गणेशोत्सवासाठी विविध मंडळे आणि घरगुती गणेशभक्त आपल्या श्रद्धा व कल्पकतेने सजावट करतात. यंदा अकोल्यातील सुरभी दोडके यांनी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेली गणेशसजावट विशेष आकर्षण ठरत आहे.



किल्ल्यासारख्या भव्य बांधकामात विराजमान गणेशमूर्ती हा सजावटीचा मुख्य केंद्रबिंदू आहे. किल्ल्याच्या भिंतींवर काळ्या दगडी वीटांची नक्षी, बुरुजांवर पहारेकरी, तर प्रवेशद्वारावर लखलखणारा “जय मल्हार” फलक – पाहणाऱ्यांना थेट जेजुरीतील खंडोबाची आठवण करून देतो. किल्ल्याच्या वरच्या भागात संत गजानन महाराजांची मूर्ती वृक्षांच्या छायेखाली विराजमान आहे. पार्श्वभूमीत उगवता सूर्य आणि आकाशात उडणारे पक्षी सजावटीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्पर्श देतात.



ही सजावट दोन दिवसांत सुरभी दोडके यांनी साकारली असून, त्यांच्या संभाजीनगर येथील भाऊ अभिषेक दोडके यांनी त्यांना मदत केली. “ही केवळ सजावट नसून भक्तिभाव, पराक्रम आणि अध्यात्म यांचा संगम आहे,” असे सुरभी यांनी सांगितले. मातीपासून तयार केलेल्या “मल्हार गणपती” मुळे या सजावटीला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची आगळीवेगळी छटा लाभली आहे. किल्ला, गणेश, संत गजानन महाराज आणि जय मल्हार या चार प्रतीकांचा सुंदर संगम भाविकांना भारावून टाकतो.

टिप्पण्या