मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल हे अर्धसत्य – सुनील देवधर

 



अकोला दिनांक 15 : दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, याच्यापेक्षा मोठं चूप, याच्यापेक्षा मोठा धोका कोणता असू शकत नाही. बिना आजादी बिना ढाल जर स्वातंत्र्य मिळाले तर भगत सिंग, राजगुरूं, सुखदेव, चाफेकर बंधु, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अल्लूरी सीताराम राजू, या सारख्या असंख्य क्रांतिकारकांनी शस्त्र उचलले त्यांचं योगदान नाही? त्यांच्या योगदानाच्या बद्दल प्रश्न नाहीये. फक्त त्यांच्यामुळे आझादी मिळाली हे धादांत असत्य आहे. हे अर्धसत्य आहे, असा प्रहार संस्कृती संवर्धन समिती, अकोला यांच्या वतीने आयोजित अखंड भारत संकल्प दिनानिमित्त जाहीर व्याख्यानात सुनील देवधर यांनी केला. 


खंडेलवाल भवन येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख वक्ते सुनील देवधर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश संतानी, समिती अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, स्वागत समिती अध्यक्ष अरविंद देठे उपस्थित होते. 




         “अखंड भारत – संकल्प ते साकार” या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संयोजक – पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठ व माजी राष्ट्रीय संयोजक सुनील देवधर यांचे परखड विचार ऐकण्यासाठी अकोलेकरांनी तुफान गर्दी केली होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान आणखीन एका महापुरुषाचे आहे, तो महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. पुढे त्यांनी आपल्या उद्बोधनात अखंड भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, फाळणीनंतरच्या राजकीय घडामोडी, सांस्कृतिक एकात्मतेचे महत्त्व आणि भविष्यातील भारताच्या पुनःएकत्रीकरणाची शक्यता या विषयांवर सखोल विवेचन केले. “ भारताची खरी शक्ती त्याच्या सांस्कृतिक मुळांमध्ये आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपले योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.



         कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व परिचय सोनल ठक्कर यांनी, तर प्रास्ताविक प्रा. नितीन बाठे यांनी केले. रश्मी कायंदे यांनी अखंड भारत निबंध स्पर्धेबाबत माहिती देत विजेत्यांची घोषणा केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली. विनय जकाते यांनी वैयक्तिक गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे संचालन चेतन काळे यांनी केले. महेश जोशी यांनी “वंदे मातरम्” गायले. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने समीर थोडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून, अशा उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. 

  


निबंध स्पर्धेचे विजेता


अ गट - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकांचे योगदान

प्रथम :- ध्रुवी उ. कळकर्णी - खंडेलवाल इंग्लिश प्राइमरी स्कूल

द्वितीय :- तेजस्विनी देशमुख विवेकानंद प्रायमरी स्कूल

तृतीय :- भावेश शर्मा भारत विद्यालय



गट ब – भारताच्या फाळणीची शोकांतिका

प्रथम :- समृद्धी पांडव, विवेकानंद प्रायमरी स्कूल

द्वितीय :- समृद्धी ग. थोरात, बाल शिवाजी

तृतीय :- भाविका सोनटक्के, राजेश्वर कॉन्व्हेंट



खुला गट - अखंड भारताचा मागोवा

प्रथम :- अपेक्षा यो. आवळे बाल शिवाजी

द्वितीय :- सोनाली सोनवणे संताजी इंग्लिश स्कूल

तृतीय :- पूजा रमेश भाकरे संताजी इंग्लिश स्कूल

निबंध स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मधुरा भारतीय, महेश ठोके, सुहास देशपांडे यांचे लाभले.

टिप्पण्या