मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

  अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले. स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन...

दुर्धर आजारांवर होमिओपॅथी ठरतेय संजीवनी

 


अकोला : आजच्या धकाधकीच्या काळात साधा सर्दी पडसा जरी झाला तरी, ताबडतोब बरे वाटावे म्हणून आपण ऍलोपॅथीकडे वळतो. परंतु होमिओपॅथी औषधाने स्वस्तात व कोणतेही साईड इफेक्ट न करता दुर्धर आजार देखील बरे होतात. अशा अनेक रुग्णांना अकोला येथील डॉक्टर संदिप चव्हाण यांनी रोगमुक्त केले आहे. 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन (World Homoeopathy Day)आहे त्यानिमित्त लिहिलेला हा विशेष लेख.

होमिओपॅथी सेंट्रल नर्व्हस सिस्टीम द्वारे कार्य करते तर ऍलोपॅथी इतर पचनसंस्थेतून. ऍलोपॅथी मध्ये साधारणता पथ्य पाळावे लागत नाही होमिओपॅथी मध्ये औषधासोबत पथ्य पाळावे लागतात. अनेक रुग्णांना वर्षानुवर्ष जुने आजार असतात. त्यांना क्रोनिक (chronic) आजार म्हणतात. असे अनेक रुग्ण ठणठणीत केल्याचे डॉक्टर संदिप चव्हाण यांनी सांगितले. पचन क्रिया बिघडल्यास अल्सरटीव्ह कोलाइटिस सारखे आजार होतात. यामध्ये खाल्ल्यानंतर काहीच पचत नाही. मात्र होमिओपॅथी मध्ये यावर उपचार आहेत. इतर ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वस्त दरात नियमित औषध घेतल्यास होमिओपॅथी वरदान ठरू शकते.


कॅन्सर (cancer) सुद्धा बरा होतो


आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात येताच होमिओपॅथी (homoeopathy) उपचार सुरू केल्यास कॅन्सर सुद्धा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो असे डॉक्टर संदिप चव्हाण यांनी सांगितले. मुळव्याध सुद्धा शस्त्रक्रिया न करता अल्पदरात पूर्णपणे बरा करता येतो. होमिओपॅथी मध्ये नेहमी संशोधन करून औषध (medicine) तयार होत राहतात. सिद्धांतांवर आधारित औषधी आहेत. होमिओपॅथी मध्ये उपचारासाठी खूप वेळ लागतो असा गैरसमज आहे. मात्र औषध जिभेवर टाकल्याबरोबर काही सेकंदातच पुढील कार्य सुरू होते. 


औषधांचा अतिरेक हानिकारक


पुढे बोलताना डॉक्टर चव्हाण म्हणाले की, कोरोना काळात ज्यांनी औषधांचा अतिरेक केला त्यांना आज विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. आपल्या मनाने औषध घेऊ नका. अनुभवी डॉक्टर कडून औषध घ्या. ज्याप्रमाणे वारंवार मद्य प्राशन केल्याने किडनी खराब होते त्याचप्रमाणे औषधांचा अतिरेक केल्याने देखील किडनीवर दुष्परिणाम होतात. 

टिप्पण्या