मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

  अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले. स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन...

पीकेव्ही मधील प्रकल्पग्रस्तांसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करा : आ. सावरकर




अकोला : स्थानिक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात(pkv) कार्यरत प्रकल्पग्रस्तांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी वयोमर्यादेची अट शिथिल करून नेमणूक द्यावी अशी मागणी अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ज्या जमीन मालकांची जमीन संपादित करून विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली, अशा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना शासकीय चाकोरी सोबत सामाजिक संवेदनेतून पाहणे आवश्यक आहे. पीकेव्ही मध्ये दीर्घ काळापासून रोजंदारी आस्थापनेवर शासन सेवेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाच्या पदभरतीमध्ये वयाची शिथिलता देण्यात यावी अशी विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. भूमिपुत्रांच्या प्रकल्प ग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ.रणधीर सावरकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी वर्ग-क व वर्ग-ड पदांसाठी पद भरती करिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर जाहिरातीमध्ये वयाची अट असल्यामुळे रोजंदारीवर दीर्घकाळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. सदर अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या करिता विद्यापीठाकडे नियमित पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे परंतु विद्यापीठाकडून कोणती ही दाद दिली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट केले. विद्यापीठाच्या वतीने सन २००९ मध्ये प्रकल्प ग्रस्तांसाठी पदभरती योजना राबविण्यात आली होती. या योजनेमध्ये वयोमर्यादेची कोणतीही अट घालण्यात आली नव्हती संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी वयाची अट शिथिल करून सन २००९ मध्ये विद्यापीठाकडून प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरीतीनुसार उमेदवारांनी योग्य त्या शुल्कासह अर्ज सादर केले होते परंतु १५ वर्ष पेक्षा अधिक कालावधी उलटून सुद्धा विद्यापीठाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सदर जाहिरीतीनुसार पदभरती झाली असती तर सद्याची परिस्थिती उद्भवली नसती. सदरची जाहिरात विद्यापीठाने रद्द केल्याची सुद्धा नोंद नाही. त्यामुळे विद्यापीठाची भूमिका गुलदस्त्यात आहे. अशा प्रकारचा अन्याय प्रकल्पग्रस्तांवर झाला असल्याचे कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य तथा आमदार रणधीर सावरकर यांना यावेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या