मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

आलेगाव प्रकरणात पोलिसांनी खरी माहिती घेऊनच कारवाई करावी : आ सावरकर







आलेगाव प्रकरणात आमदार सावरकर यांच्या पोलीस विभागाला सूचना


अकोला : पातुर तालुक्यातील आलेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात व्यावसायिकावर गुन्हा दाखल केल्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेतली. या प्रकरणी खरी माहिती घेऊनच पोलिसांनी कारवाई करावी, निर्दोष व्यक्तींवर अन्याय होता कामा नये असे स्पष्ट मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या.  आलेगाव प्रकरणात व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांशी चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विरोधात संपूर्ण गाव जात- धर्म विसरून एकत्रित आला आहे. यावरून गुन्हा दाखल करण्याच्या मागे उद्देश काय असू शकतो याची प्रचिती येते असे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले आहे. आलेगाव येथील ग्रामस्थांनी व्यापार बंद ठेवला, तसेच मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या घटने संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी व निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत तसेच पीडित व्यक्तीला सुद्धा न्याय मिळावा. या प्रकरणात खरी माहिती घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे आमदार सावरकरांनी सांगितले. यावेळी आलेगाव घटने संदर्भात भाजपा शिष्टमंडळाने व्यापाऱ्यांची बाजू मांडली व न्याय देण्याची मागणी केली. यावेळी मा. महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, शंकर वाकोडे, भिकाभाऊ धोत्रे, रमण जैन, चंद्रकांत अंधारे बबनदादा कालदाते गणेश ढोणे दिलीप काळपांडे,विनोद काठोळे,सखाराम लहमगे, शामराव कालदाते व गांवकरी उपस्थित होते.



टिप्पण्या