मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

बच्चन सिंग स्वतः उतरले रस्त्यावर

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_57.html 

24 तासात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली




अकोला : जुने शहरातील हरिहर (hariharpeth) पेठ येथे ऑटो चा धक्का लागल्यावरून दोन समुदायात वाद झाल्यानंतर एकमेकांवर दगडफेक (dagadfek) करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वतः रस्त्यावर उतरले. पोलीस दलातील प्रचंड अनुभव असल्याने 24 तासात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे एकीकडे हरिहर पेठ भागात तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने लगतच्या डाबकी रोडवर सर्व दुकाने सुरू होते. 

याप्रसंगी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व कडक बंदोबस्त परिसरात लावण्यात आला होता.




 कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केल्याने काही तासातच वातावरण शांत झाले. ऑटोरिक्षाला दुचाकीची धडक लागल्यामुळे ही घटना घडली. या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे. 




मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक (atak)करण्याची कारवाई सुरू केली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 30 ते 40 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या