मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

बच्चन सिंग स्वतः उतरले रस्त्यावर

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_57.html 

24 तासात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली




अकोला : जुने शहरातील हरिहर (hariharpeth) पेठ येथे ऑटो चा धक्का लागल्यावरून दोन समुदायात वाद झाल्यानंतर एकमेकांवर दगडफेक (dagadfek) करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वतः रस्त्यावर उतरले. पोलीस दलातील प्रचंड अनुभव असल्याने 24 तासात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे एकीकडे हरिहर पेठ भागात तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने लगतच्या डाबकी रोडवर सर्व दुकाने सुरू होते. 

याप्रसंगी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व कडक बंदोबस्त परिसरात लावण्यात आला होता.




 कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केल्याने काही तासातच वातावरण शांत झाले. ऑटोरिक्षाला दुचाकीची धडक लागल्यामुळे ही घटना घडली. या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे. 




मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक (atak)करण्याची कारवाई सुरू केली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 30 ते 40 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या