मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

बच्चन सिंग स्वतः उतरले रस्त्यावर

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_57.html 

24 तासात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली




अकोला : जुने शहरातील हरिहर (hariharpeth) पेठ येथे ऑटो चा धक्का लागल्यावरून दोन समुदायात वाद झाल्यानंतर एकमेकांवर दगडफेक (dagadfek) करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वतः रस्त्यावर उतरले. पोलीस दलातील प्रचंड अनुभव असल्याने 24 तासात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे एकीकडे हरिहर पेठ भागात तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने लगतच्या डाबकी रोडवर सर्व दुकाने सुरू होते. 

याप्रसंगी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व कडक बंदोबस्त परिसरात लावण्यात आला होता.




 कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केल्याने काही तासातच वातावरण शांत झाले. ऑटोरिक्षाला दुचाकीची धडक लागल्यामुळे ही घटना घडली. या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे. 




मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक (atak)करण्याची कारवाई सुरू केली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 30 ते 40 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या