मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

 



अकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते. 




म. गांधी, लालबहादूर शास्त्री, शिवाजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे,श्री बबनराव कानकिरड, प्रा सुशीला मळसणे,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय तिडके, अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ. मिलींद निवाणे उपस्थित होते.




 कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बबनराव कानकिरड यांनी म. गांधींच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य या अष्टांग व्रताचा युवकांनी अंगिकार करावा असे प्रतिपादन केले. डॉ. मिलींद निवाने यांनी प्रत्यक्ष चरख्यावर सूत तयार करून दाखविले व स्वतःच्या अंगातील शर्ट या सूतापासून बनविल्याचे सांगितले.



कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण एड. गजाननराव पुंडकर यांनी

केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. अर्चना पोटे (सपकाळ) यांनी केले. प्रास्ताविक व परिचय कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुशीला मळसणे व आभार प्रा मोनिका फाले यांनी मानले




. कार्यक्रमाला प्रा. गोविंद काळे (विज्ञान विभाग प्रमुख) प्रा. डॉ. अस्मिता बढे (वाणिज्य विभाग प्रमुख) प्रा. रंजीता फुटाणे (कला विभाग प्रमुख) यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.



    

टिप्पण्या