मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश

  अकोला दि. 25 : लवकरच महानगरपालिकेच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. आवश्यकता असल्यास, शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षकांची भरती करावी असे यावेळी ते म्हणाले. स्थायी समिती सभागृहात मनपा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकमीध्ये नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनिल मेश्राम, नितिन ताकवाले, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शिक्षण विभागांतर्गत करण्यात येणा-या तयारी व उपाययोजना संदर्भात संपुर्ण आढावा घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे, मनपाच्या शाळांचे रेकॉर्ड डिजीटलाईज करून जतन करणे, पासवाचे दिवस लक्षात घेता ज्या शाळा गळतात त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, नगरसेवकांव्दारे शाळा किंवा शिक्षण संदर्भातील तक्रारींचे निराकरण तातडीने करणे, मनपा शाळांमध्ये नियमीत भेटी देऊन...

जसपाल सिंह नागरा यांच्या पाठीवर डॉ.विश्वरूपराय चौधरी यांची कौतुकाची थाप

 


अकोला : जसपाल सिंह नागरा यांनी नॅचरोपॅथीच्या माध्यमातून संतुलित आहाराचा सल्ला देत शेकडो रुग्णांना बरे केले. अनेक रुग्णांना कॅन्सर पासून मुक्त केले. कुठल्याही औषधाशिवाय आज हे रुग्ण आनंदी जीवन जगत आहेत. नुकतीच जसपाल सिंह नागरा यांच्या कडून माहिती जाणून घेतल्यानंतर डॉ. विश्व रूप राय चौधरी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

     नॅचरोपॅथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपचार पद्धती बद्दल सखोल चर्चा करण्यासाठी जसपाल सिंह नागरा नुकतेच दिल्ली येथे गेले. यावेळी त्यांचे नातू राजवीर सिंह नागरा त्यांच्यासोबत होते.तब्बल दीड तास त्यांनी विश्वरूप राय चौधरी यांच्याशी सखोल चर्चा केली. यावेळी चौधरी यांनी भोजन ही दवा है अशा शब्दात नॅचरोपॅथीचे महत्त्व सांगितले.

   प्रत्येकाने आहारामध्ये ग्रीन सलाद, फळे व अंकुरित कडधान्य यांचा समावेश करावा असे चौधरी म्हणाले. यावेळी चौधरी यांनी नॅचरोपॅथीचे सखोल ज्ञान असलेले डी आय पी डायट नावाचे पुस्तक जसपाल सिंह नागरा यांना भेट म्हणून दिले. फास्ट फूड, वेळी अवेळी भोजन, झोपण्याची अनिश्चित वेळ यामुळे विविध व्याधी उद्भवत असल्याचे जसनागरा यांनी सांगितले

टिप्पण्या